महाराष्ट्र

केज शहरात अतिक्रमणांवर मोठी कारवाई; प्रशासन ऍक्शन मोडवर

केज: केज शहरातील रस्त्यांवर शासकीय जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे.

यासंदर्भात काल वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, केज शहरातील विविध भागांमध्ये शासकीय जागेवर झालेले सर्वच अतिक्रमण सरसकट हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लवकरच ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार असल्याने शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार आहे.

अतिक्रमणांमुळे रस्त्यांवर सतत होणारी वाहतूक कोंडी, गर्दी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता प्रशासनाच्या या निर्णायक भूमिकेमुळे या समस्यांवर तोडगा निघणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केज शहरातील सर्वच शासकीय जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, या मोहिमेबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण आहे. रस्ते मोकळे झाल्यास वाहतूक अधिक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

9 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

15 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

16 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

16 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

16 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

16 तास ago