मुंबई: मार्वे चौपाटीवर रविवारी घडलेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर सागरी जीवरक्षक तैनात करण्यात यावेत, तसेच दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली.
अस्लम शेख पुढे म्हणाले, जीवरक्षक, झाडांची छाटणी अशा विविध कारणांसाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करते. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. कधीतरी महानगरपालिका त्यांची ही जबाबदारी स्वीकारणार आहे का..?
मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह सोमवारी दुपारपर्यंत सापडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी तातडीने मार्वे समुद्र किनारी सागरी जीवरक्षक तैनात करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२…
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम…
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…