महाराष्ट्र

वटपौर्णिमेच्या दिवशीच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बीड: वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. वर्षा ओमप्रकाश लाखे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला. नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता.

सासरकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी विहिरीत उडी मारून आयु्ष्य संपवलं. या महिलेचा तिच्या सासरच्यांनी घात केला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकानी केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

वर्षाच्या आईने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं. सासरवास होता तिला. सतत मारहाण केली जात होती. आई-बापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा. लग्नाला १० वर्षे झाली होती. ६ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा हिच आमची मागणी आहे.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

27 मिनिटे ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

2 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

7 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

7 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

7 तास ago