मुंबई: महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारला धारेवर धरले.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याकडून एका लाखाच्या कर्जासाठी ७४ लाख सावकाराने वसूल केले. शेवटी ट्रॅक्टर आणि शेती जाऊनही कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आली. या पीडित शेतकऱ्याला परदेशात डेटा सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पाठवले गेले. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला मायदेशी परत आणले.
या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरलेली आहेत. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असा प्रश्न त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
या किडनी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर ‘मोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली..यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री यांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात येणार. अशा प्रकरणात कायदा कठोर करण्यासाठी सरकार काम करेल असे आश्वासन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आपली किडनी गमावली आहे, ते कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर गृहराज्यमंत्री यांनी या कुटुंबाला सरकार मदत करेल असे आश्वासन दिले.
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…