मुंबई: महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारला धारेवर धरले.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याकडून एका लाखाच्या कर्जासाठी ७४ लाख सावकाराने वसूल केले. शेवटी ट्रॅक्टर आणि शेती जाऊनही कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आली. या पीडित शेतकऱ्याला परदेशात डेटा सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पाठवले गेले. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला मायदेशी परत आणले.
या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरलेली आहेत. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असा प्रश्न त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
या किडनी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर ‘मोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली..यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री यांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात येणार. अशा प्रकरणात कायदा कठोर करण्यासाठी सरकार काम करेल असे आश्वासन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आपली किडनी गमावली आहे, ते कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर गृहराज्यमंत्री यांनी या कुटुंबाला सरकार मदत करेल असे आश्वासन दिले.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…