कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिले. तसेच संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील ट्रॅफिक समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी Mumbai Metropolitan Region Development Authority ला कन्सल्टंट नेमण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
एमसीएचआय-क्रेडाईतर्फे आयोजित १५ व्या प्रॉपर्टी व होम फायनान्स एक्स्पोच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गेली १५ वर्षे या प्रदर्शनात सातत्याने सहभागी होत असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले.
ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात असून शहरांचा चेहरामोहरा बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले. परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर ५० टक्के प्रीमियम माफीचा निर्णय घेऊन विकासकांना दिलासा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआर तयार करताना विकासकांचे मत विचारात घेतल्याने गृहनिर्माण प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बांधकाम क्षेत्रावर सुमारे २५० पूरक उद्योग अवलंबून असून रोजगार निर्मितीत त्याचा मोठा वाटा आहे. गृहनिर्माण धोरणात महिला, डबेवाले, ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगार यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
झोपडपट्टी आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांसाठी क्लस्टर योजनेला प्राधान्य दिले जात आहे. Ghatkopar येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरमध्ये सुमारे १७ हजार घरांचा क्लस्टर प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीत पायाभूत सुविधा वाढीसाठी टीडीआर धोरणात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून मेट्रो-५ प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि तळोजा हे भाग जोडले जाणार आहेत. शीळ फाटा येथे त्रिस्तरीय मार्ग उभारून वाहतूक कोंडी कमी करण्याची योजना आहे.
तसेच कल्याण रिंग रोड, ठाणे-पडघा मार्गाचे रुंदीकरण आणि एलिव्हेटेड मार्ग उभारणीमुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी समस्येसाठी काळू धरण प्रकल्पावर काम सुरू असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.विकासकांच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत, रेरा संदर्भातील समस्यांवरही सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…