महाराष्ट्र

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिले. तसेच संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील ट्रॅफिक समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी Mumbai Metropolitan Region Development Authority ला कन्सल्टंट नेमण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

एमसीएचआय-क्रेडाईतर्फे आयोजित १५ व्या प्रॉपर्टी व होम फायनान्स एक्स्पोच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गेली १५ वर्षे या प्रदर्शनात सातत्याने सहभागी होत असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले.

ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात असून शहरांचा चेहरामोहरा बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले. परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर ५० टक्के प्रीमियम माफीचा निर्णय घेऊन विकासकांना दिलासा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआर तयार करताना विकासकांचे मत विचारात घेतल्याने गृहनिर्माण प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बांधकाम क्षेत्रावर सुमारे २५० पूरक उद्योग अवलंबून असून रोजगार निर्मितीत त्याचा मोठा वाटा आहे. गृहनिर्माण धोरणात महिला, डबेवाले, ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगार यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

झोपडपट्टी आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांसाठी क्लस्टर योजनेला प्राधान्य दिले जात आहे. Ghatkopar येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरमध्ये सुमारे १७ हजार घरांचा क्लस्टर प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

कल्याण-डोंबिवलीत पायाभूत सुविधा वाढीसाठी टीडीआर धोरणात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून मेट्रो-५ प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि तळोजा हे भाग जोडले जाणार आहेत. शीळ फाटा येथे त्रिस्तरीय मार्ग उभारून वाहतूक कोंडी कमी करण्याची योजना आहे.

तसेच कल्याण रिंग रोड, ठाणे-पडघा मार्गाचे रुंदीकरण आणि एलिव्हेटेड मार्ग उभारणीमुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी समस्येसाठी काळू धरण प्रकल्पावर काम सुरू असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.विकासकांच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत, रेरा संदर्भातील समस्यांवरही सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

6 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

7 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

7 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

10 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

11 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

14 तास ago