मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ” असे संबोधत केलेल्या भाषणावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या वक्तव्यावर घणाघाती टीका करत याला “ज्ञानाचा अपमान आणि चापलुसीचा अतिरेक” असे संबोधले आहे.
टीकाकारांच्या मते, नालंदा हे प्राचीन भारतातील ज्ञान, चिंतन आणि बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक संदर्भाचा वापर करून व्यक्तिपूजेला चालना देणे ही “विचारांची पातळी खालावल्याचे लक्षण” असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राज्यात बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि महागाईसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत विरोधकांनी म्हटले आहे की, “जनतेच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी नेत्यांची स्तुती करण्यात वेळ घालवणे हे तरुण नेतृत्वाला शोभणारे नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कडूनही या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला असून, “महाराष्ट्रातील तरुण आता जागरूक आहे. तो विचार करतो, प्रश्न विचारतो आणि पोकळ स्तुतीला बळी पडणार नाही,” असे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, महाडिक यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…