मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला असताना पक्षांतर्गत राजकारण तापलेले दिसत आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली. शरद पवार गटातील काही नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याने या विषयावर अधिकच खळबळ उडाली आहे.
मात्र, या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. विलीनीकरणाच्या वादावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनीही या विषयावर सार्वजनिक भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी नुकतीच दिल्ली भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याच्या बैठकीत सहभाग घेतला. पुढे ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या संयुक्त वार्षिक आराखड्याच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या.
राजकीय पातळीवर विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाही सुनेत्रा पवार यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या मौनामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून पुढील काही दिवसांत या विषयावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…