मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला असताना पक्षांतर्गत राजकारण तापलेले दिसत आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली. शरद पवार गटातील काही नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याने या विषयावर अधिकच खळबळ उडाली आहे.
मात्र, या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. विलीनीकरणाच्या वादावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनीही या विषयावर सार्वजनिक भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी नुकतीच दिल्ली भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याच्या बैठकीत सहभाग घेतला. पुढे ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या संयुक्त वार्षिक आराखड्याच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या.
राजकीय पातळीवर विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाही सुनेत्रा पवार यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या मौनामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून पुढील काही दिवसांत या विषयावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…