मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. धोकादायक म्हणुन घोषित झालेल्या या १७ इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा याबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. परंतु याला तीन वर्ष उलटली तरी या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. या सर्व इमारती सी-१ कॅटॅगरीतील आहेत.
त्यामुळे त्याचा पुनर्विकास तातडीने होणे आवश्यक आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाचे टेंडर म्हाडाने काढावे. म्हाडाने काॅन्ट्रक्टर म्हणून यात सामिल व्हावे, अशी सुचना वायकर यांनी यावेळी केली. या ठिकाणी कुठलीही मोठी जिवितहानी अथवा दुर्घटना घडण्यापुर्वी म्हाडाने या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू करावे, अशी मागणी वायकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…