मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. धोकादायक म्हणुन घोषित झालेल्या या १७ इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा याबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. परंतु याला तीन वर्ष उलटली तरी या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. या सर्व इमारती सी-१ कॅटॅगरीतील आहेत.
त्यामुळे त्याचा पुनर्विकास तातडीने होणे आवश्यक आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाचे टेंडर म्हाडाने काढावे. म्हाडाने काॅन्ट्रक्टर म्हणून यात सामिल व्हावे, अशी सुचना वायकर यांनी यावेळी केली. या ठिकाणी कुठलीही मोठी जिवितहानी अथवा दुर्घटना घडण्यापुर्वी म्हाडाने या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू करावे, अशी मागणी वायकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…