मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. धोकादायक म्हणुन घोषित झालेल्या या १७ इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा याबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. परंतु याला तीन वर्ष उलटली तरी या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. या सर्व इमारती सी-१ कॅटॅगरीतील आहेत.
त्यामुळे त्याचा पुनर्विकास तातडीने होणे आवश्यक आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाचे टेंडर म्हाडाने काढावे. म्हाडाने काॅन्ट्रक्टर म्हणून यात सामिल व्हावे, अशी सुचना वायकर यांनी यावेळी केली. या ठिकाणी कुठलीही मोठी जिवितहानी अथवा दुर्घटना घडण्यापुर्वी म्हाडाने या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू करावे, अशी मागणी वायकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी…
मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…
मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच…
मुंबई: राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या…
मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज…
मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास... या…