मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड यांनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही आक्षेपार्ह भाष्य केले आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सपकाळ यांनी पुढे आरोप केला की, गायकवाड यांच्यावर यापूर्वीही मारहाण, धमकी, वाळू तस्करी आणि जमिनी बळकावण्यासारख्या गंभीर तक्रारी आहेत. तसेच त्यांनी पूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांचाही उल्लेख करत, अशा वर्तनावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बोलताना गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. यापूर्वीही विविध नेत्यांनी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावरून सरकार अशा प्रवृत्तीला समर्थन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या प्रस्तावावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मराठी भाषेचे संवर्धन अत्यावश्यक आहे. मात्र, सक्तीऐवजी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठीचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…