महाराष्ट्र

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक नागरिकांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, जयंतीला १० दिवस उलटूनही ही शौचालये अद्याप त्याच अवस्थेत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडेही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडगीळ यांनी केला आहे.

यासोबतच ‘राजगृह’ परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. काही वर्षांपूर्वी विधानपरिषदेत स्वतः गाडगीळ यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ‘राजगृहाभोवतालच्या अर्धा किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या अतिक्रमणाला बंदी’ असल्याचे जाहीर केले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

तथापि, सध्याच्या घडीला ‘राजगृह’ परिसर टॅक्सी, फेरीवाले आणि शाळांच्या अनधिकृत वाहनांनी वेढलेला आहे. या संदर्भात गाडगीळ तसेच स्थानिक नागरिकांनी ‘एफ’ विभागाच्या उपआयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा हा आदर आहे का, असा थेट आणि परखड सवाल अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago