महाराष्ट्र

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक नागरिकांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, जयंतीला १० दिवस उलटूनही ही शौचालये अद्याप त्याच अवस्थेत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडेही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडगीळ यांनी केला आहे.

यासोबतच ‘राजगृह’ परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. काही वर्षांपूर्वी विधानपरिषदेत स्वतः गाडगीळ यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ‘राजगृहाभोवतालच्या अर्धा किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या अतिक्रमणाला बंदी’ असल्याचे जाहीर केले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

तथापि, सध्याच्या घडीला ‘राजगृह’ परिसर टॅक्सी, फेरीवाले आणि शाळांच्या अनधिकृत वाहनांनी वेढलेला आहे. या संदर्भात गाडगीळ तसेच स्थानिक नागरिकांनी ‘एफ’ विभागाच्या उपआयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा हा आदर आहे का, असा थेट आणि परखड सवाल अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

8 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

9 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

9 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

9 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

10 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

10 तास ago