महाराष्ट्र

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेस चालना देणारा महत्त्वपूर्ण करार

मुंबई: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

काल मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक (प्रशासन) शंतनु पवार, केंद्र प्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद , श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर संस्थेचे नवल जीत कपुर, अनुप गोयल, संजय भोसले उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) आणि नेतृत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचे ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

3 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

3 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

5 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago