महाराष्ट्र

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केले आंदोलन

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरूने न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली होती. मनुवादी मानसिकतेतून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर केलेला हा हल्ला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आंदोलन करून तीव्र निषेध केला.

सरन्यायाधीश हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असतात. त्यांच्यावर न्यायमंदिरात हल्ला होणे हा संविधान आणि न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. हल्लेखोर वकील हा मनुवादी विचारसणीचा असून हल्ला केल्यानंतरही तो सातत्याने संविधान विरोधी वक्तव्ये करत आहे. या माथेफिरू हल्लेखोराविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून त्याचा निषेध केला जात आहे. आज युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजळ आरएसएसच्या स्वयंसेवकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून या हल्ल्याचा निषेध करत तीव्र आंदोलन केले. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत पण संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लढत राहू असे झिनत शबरीनं यावेळी म्हणाल्या.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झिनत शबरीन यांचे आज मुंबईत युवक काँग्रसतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळापासून भव्य रॅली काढून त्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज, कुपरेज येथील माजी पंतप्रधान राजीव गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर आंदोलन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

7 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

13 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

13 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

13 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

13 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago