महाराष्ट्र

ओबीसी विचार देशभर पोहोचवण्याची गरज; राहुल गांधींच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्या; हर्षवर्धन सपकाळ

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार

मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी विचार दिला असून, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे मूलभूत आधार आहेत. जातीपलीकडे जाऊन माणसाला केंद्रस्थानी ठेवणारा महाराष्ट्राचा हा विचार आता देशभर पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आयोजित ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस अनंत मोहोड, पनवेल जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, काँग्रेस हा सर्व समाजघटकांना समान संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सामाजिक न्यायाचा एल्गार पुकारला आहे. “जिसकी जितनी आबादी, उतनी भागीदारी” या तत्त्वानुसार पक्ष आणि संघटनेत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले जात आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या सामाजिक न्यायाच्या लढ्याला देशभर बळ देण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भानुदास माळी यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, फुले यांचा समतावादी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे सांगितले. या अभियानाची सांगता सातारा जिल्ह्यातील विशेष सभेने होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी तसेच ओबीसी समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

TET पेपरफुटीप्रकरणी विधानभवनात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे; NSUI चे आंदोलन

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन…

3 मिनिटे ago

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध; डॉ. राजेश गवांदे

मुंबई: महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा (Oral Healthcare) क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य…

13 मिनिटे ago

नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे शिवसेना महिला आघाडीने केले स्वागत; शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी

मुंबई: नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल शिवसेना…

45 मिनिटे ago

एमएमआरचा सर्वांगीण विकास काही वर्षांत प्रत्यक्षात; परवडणारी घरे आणि आधुनिक वाहतूक सुविधांवर भर; डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर…

49 मिनिटे ago

बिश्नोई गँगवर सरकारला काँग्रेसचा घेराव; कायदा-सुव्यवस्थेवर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर प्रश्न

मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेल्या खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या वाढत्या घटनांवरून…

54 मिनिटे ago

बदर समितीचा अहवाल जाहीर केल्याशिवाय उपवर्गीकरणाचे विधेयक आणू नका; विजय वडेट्टीवार

मुंबई: अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईत निघालेल्या मोठ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय…

1 तास ago