महाराष्ट्र

ओबीसी विचार देशभर पोहोचवण्याची गरज; राहुल गांधींच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्या; हर्षवर्धन सपकाळ

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार

मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी विचार दिला असून, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे मूलभूत आधार आहेत. जातीपलीकडे जाऊन माणसाला केंद्रस्थानी ठेवणारा महाराष्ट्राचा हा विचार आता देशभर पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आयोजित ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस अनंत मोहोड, पनवेल जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, काँग्रेस हा सर्व समाजघटकांना समान संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सामाजिक न्यायाचा एल्गार पुकारला आहे. “जिसकी जितनी आबादी, उतनी भागीदारी” या तत्त्वानुसार पक्ष आणि संघटनेत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले जात आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या सामाजिक न्यायाच्या लढ्याला देशभर बळ देण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भानुदास माळी यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, फुले यांचा समतावादी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे सांगितले. या अभियानाची सांगता सातारा जिल्ह्यातील विशेष सभेने होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी तसेच ओबीसी समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

30 मिनिटे ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

34 मिनिटे ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

14 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

14 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

14 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

14 तास ago