महाराष्ट्र

राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्याची गरज; विश्वास उटगी

राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, १ ऑगस्ट रोजी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई: इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला काल ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपह १ ऑगस्ट रोजी दादरच्या टिळक भवन येथे एका बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी दिली आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती देताना विश्वास उटगी म्हणाले की, बँकांचे ताळेबंद सशक्त आहेत पण भारत सरकार व रिजर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील मेाठी बँक IDBI ची विक्री विदेशी बँकांना करीत आहे. अर्थ व्यवस्थेत बॅंकीग क्षेत्रात विदेशी भांडवलाचा प्रवेश हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे पण राष्ट्रीयकरण संपविणे ही या प्रक्रियेची सुरुवात आहे. १२ राष्ट्रीयकरण झालेल्या बॅंकांपैकी ५ बॅंकांना केंद्र सरकारच्या असेट मेानेटायझेशन पाइपलाइन मार्फत Disinvestment कार्यक्रम राबविण्यात येईल व या बॅंकांच्या खाजगीकरणाची सुरुवात होईल. यांची विक्री विदेशी भांडवलदारांना होणे हे जनतेला मान्य होणारे नाही. याला कडाडून विरेाध करणे आवश्यक आहे. बँक कामगार संघटना हे काम करीत आहेत. राजकीय पक्ष व पुरेागामी विचारांच्या संघटनांनी व्यापक भूमिका घेऊन बॅंक राष्ट्रीयकरण या संकल्पनेला सुरुवातीपासून विरोध करणारे आजच्या केंद्र सरकारमध्ये आहेत त्यामुळे बॅंकाविषयी काय कारस्थान व आंतरराष्ट्रीय भांडवलदारांशी काय साटेलेाटे आहेत हे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयकरणाने देशाचा विकास कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. मागील १० वर्षांत मेादी सरकारने ही व्यवस्था खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. बॅंक राष्ट्रीयीकरण वाचविण्याचा प्रयत्न हा आता नागरिकांच्या व बॅंकांचे लाभार्थी यांची एकजुट करून मेादी सरकारचा डाव हाणून पाडता येईल. बँकातील कर्मचारी व अधिकारी आणि निवृत्त बँक कर्मचारी जर अग्रेसर असतील तर या लढयाला मेाठया चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने पहिली जाहीर सभा होत असून टिळक भवन येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ही सभा होत आहे. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, विश्वास उटगी, संजीव चांदोरकर यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार आहेत, असेही विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

11 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

11 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

11 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

11 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

11 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

20 तास ago