महाराष्ट्र

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी, सर्व बँका राहणार बंद, फक्त ‘या’ सेवा सुरू राहणार

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बँकाही बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सचनेनुसार, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या नियमित बँकिंग सेवा जसे की पैसे काढणे, जमा करणे किंवा चेक क्लिअरिंग करायचे आहे, त्यांनी 20 नोव्हेंबरपूर्वी किंवा नंतर करावे. मात्र, बँकेला सुट्टी असली तरी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा सामान्यपणे सुरू राहतील. याचा अर्थ ग्राहक या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केव्हाही आणि कोठूनही आर्थिक व्यवहार करू शकतात.

सर्व कंपन्यांमध्ये सुट्टी अनिवार्य

मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी, भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की, सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य आहे. कोणत्याही कंपनीने हा नियम न पाळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. निवडणुकीदरम्यान कोणतीही व्यक्ती त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा सुट्टीचा उद्देश आहे. दरम्यान, सर्व आपात्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

1 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

2 तास ago

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…

2 तास ago

जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास…

2 तास ago

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…

4 तास ago

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

21 तास ago