महाराष्ट्र

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी, सर्व बँका राहणार बंद, फक्त ‘या’ सेवा सुरू राहणार

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बँकाही बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सचनेनुसार, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या नियमित बँकिंग सेवा जसे की पैसे काढणे, जमा करणे किंवा चेक क्लिअरिंग करायचे आहे, त्यांनी 20 नोव्हेंबरपूर्वी किंवा नंतर करावे. मात्र, बँकेला सुट्टी असली तरी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा सामान्यपणे सुरू राहतील. याचा अर्थ ग्राहक या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केव्हाही आणि कोठूनही आर्थिक व्यवहार करू शकतात.

सर्व कंपन्यांमध्ये सुट्टी अनिवार्य

मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी, भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की, सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य आहे. कोणत्याही कंपनीने हा नियम न पाळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. निवडणुकीदरम्यान कोणतीही व्यक्ती त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा सुट्टीचा उद्देश आहे. दरम्यान, सर्व आपात्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

13 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

13 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

13 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

13 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

15 तास ago