मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बँकाही बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू राहणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सचनेनुसार, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या नियमित बँकिंग सेवा जसे की पैसे काढणे, जमा करणे किंवा चेक क्लिअरिंग करायचे आहे, त्यांनी 20 नोव्हेंबरपूर्वी किंवा नंतर करावे. मात्र, बँकेला सुट्टी असली तरी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा सामान्यपणे सुरू राहतील. याचा अर्थ ग्राहक या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केव्हाही आणि कोठूनही आर्थिक व्यवहार करू शकतात.
सर्व कंपन्यांमध्ये सुट्टी अनिवार्य
मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी, भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की, सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य आहे. कोणत्याही कंपनीने हा नियम न पाळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. निवडणुकीदरम्यान कोणतीही व्यक्ती त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा सुट्टीचा उद्देश आहे. दरम्यान, सर्व आपात्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहेत.
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…
दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…
चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…
मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…