महाराष्ट्र

पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी; अंबादास दानवे

नागपूर: शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात अधिकारीही दोषी असून यावर कारवाईची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

शेततळे, फळबाग, कृषी लागवड, तुषार व ठिबक सिंचन आदीसाठी शेतकऱ्यांना पोखरा योजनेच्या माध्यमातून लाभ होत असतो. अकोला जिल्ह्यात ११६ गटांमध्ये कृषी कंपन्यांनी अवजारे खरेदीमध्ये कोटींचा घोटाळा केला आहे. यात मंजुरीपेक्षा कमी अवजारे खरेदी केली असून काही ठिकाणी एकही अवजारे खरेदी न करता ३ कोटी ६३ लाख रुपयांचा अपहार झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडली.

एका गटाने ट्रॅक्टर खरेदी न करताच पोखरा योजनेत दाखवून त्याचा लाभ घेतला. तर एकाने जुनं शेततळ नव्याने दाखविले.तर काहींनी मधु मक्षिका पेट्या विकत न घेता अनुदान घेतले आदी सर्व प्रकार पैठण आणि सिल्लोड मध्ये घडल्या आहेत. तर काही ठिकाणी शेडच बांधकाम नसताना अवजर वितरित केली गेली. काही शेतकरी एकाच योजनेचा दोनदा लाभ घेतात. यामागे एजंट हे कृषी अधिकारी यांच्यासोबत सहभागी असतात. शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे हा योजनेचा मुख्य उद्देश असून त्यासाठी काही उपाययोजना करणार का असा सवाल करत या दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी दानवे यांनी केली.

वर्तमानपत्राच्या बातमीवर अमरावती विभागातील कृषि संचालकांनी चौकशी सुरू केली. चौकशी अंती वाटप करण्यात आलेल्या अवजारांपैकी उपलब्ध साधनात तफावत असल्याचे आढळले. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कृषी विभागीय आयुक्त यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago