महाराष्ट्र

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे कराल अर्ज

अधिकृत वेबसाइट: https://navodaya.gov.in

थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/nvs

शैक्षणिक पात्रता

विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेत शिकलेले असावे.

विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान झालेला असावा.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खास आरक्षण एकूण जागांपैकी 75% जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

अर्ज कसा कराल

1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://navodaya.gov.in

2) “Class VI JNVST 2026-27” या लिंकवर क्लिक करा

3) विद्यार्थ्याची माहिती, पालकांची माहिती नीट भरावी

4) आवश्यक कागदपत्रे (जन्म प्रमाणपत्र, शाळा दाखला इ.) अपलोड करा

5) अर्ज पूर्ण तपासून सबमिट करा

6) प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी सुरक्षित ठेवा

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू: २ जून २०२५

अंतिम तारीख: २९ जुलै २०२५

प्रवेश परीक्षा (पहिला टप्पा): १३ डिसेंबर २०२५

दुसरा टप्पा: ११ एप्रिल २०२६

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

17 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

18 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

18 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

18 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

19 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

19 तास ago