महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचे आदेश, काम कमी भ्रष्टाचार जास्त; ॲड. अमोल मातेले

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उड्डाणपुलांच्या ‘रिसरफेसिंग’चे तातडीचे आदेश दिले असले तरी त्यामागे कामापेक्षा भ्रष्टाचाराचा खडा टक्का आणि आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय खटाटोप अधिक दिसतो, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

“मुंबईत रस्ते, उड्डाणपुलं, पायाभूत सुविधा या सगळ्यांची दशा अत्यंत वाईट आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्ती ‘तातडीची’ असतेच, पण दरवर्षी तेच आदेश आणि तेच ढिसाळ काम… फरक फक्त एवढाच कंत्राटदार बदलतात आणि टक्केवारी वाढते.”

ते पुढे म्हणाले “उपमुख्यमंत्री महोदयांनी अचानक फेब्रुवारीची डेडलाइन जाहीर करून स्वतःला ‘कामसू’ दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी मुंबईकरांना हे सारे निवडणुकीपूर्वीचे नाट्य असल्याचं चांगलं कळतं. कंत्राटदारांकडून कोणाला किती परतावा मिळणार यासाठीच ही तातडी दाखवली जात आहे.”

उड्डाणपुलांचा तांत्रिक अहवाल न पाहता थेट रिसरफेसिंगच्या सूचनांमागे संशयास्पद घाई. निवडणूक जवळ आल्यावरच विकासकामांचा सूडौल पाऊस, बाकी वर्षभर शून्य कामगिरी. ‘गुणवत्ता नियंत्रण कक्ष’ हा नावापुरता उपक्रम प्रत्यक्षात कामाचा दर्जा खालावलेला, खर्च मात्र वाढलेला.महापालिका हस्तांतरण प्रक्रियेतील मुद्दे न सोडवता राजकीय शोबाजी आणि फोटोंचा खेळ सुरू.शहरातील रस्त्यांची दुरवस्था वाढल्यावरही जबाबदार विभागांवर शून्य कारवाई.

ॲड. मातेले यांनी स्पष्ट इशारा दिला.“मुंबईकरांच्या पैशाचा हिसका चालवणारी सरकार कंत्राटदारांची साखळी आम्ही उघड करणार. जनतेसाठी काम नव्हे; तर कंत्राटांसाठी राजकारण हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

2 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

3 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

3 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

3 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

3 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

3 तास ago