महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचे आदेश, काम कमी भ्रष्टाचार जास्त; ॲड. अमोल मातेले

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उड्डाणपुलांच्या ‘रिसरफेसिंग’चे तातडीचे आदेश दिले असले तरी त्यामागे कामापेक्षा भ्रष्टाचाराचा खडा टक्का आणि आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय खटाटोप अधिक दिसतो, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

“मुंबईत रस्ते, उड्डाणपुलं, पायाभूत सुविधा या सगळ्यांची दशा अत्यंत वाईट आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्ती ‘तातडीची’ असतेच, पण दरवर्षी तेच आदेश आणि तेच ढिसाळ काम… फरक फक्त एवढाच कंत्राटदार बदलतात आणि टक्केवारी वाढते.”

ते पुढे म्हणाले “उपमुख्यमंत्री महोदयांनी अचानक फेब्रुवारीची डेडलाइन जाहीर करून स्वतःला ‘कामसू’ दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी मुंबईकरांना हे सारे निवडणुकीपूर्वीचे नाट्य असल्याचं चांगलं कळतं. कंत्राटदारांकडून कोणाला किती परतावा मिळणार यासाठीच ही तातडी दाखवली जात आहे.”

उड्डाणपुलांचा तांत्रिक अहवाल न पाहता थेट रिसरफेसिंगच्या सूचनांमागे संशयास्पद घाई. निवडणूक जवळ आल्यावरच विकासकामांचा सूडौल पाऊस, बाकी वर्षभर शून्य कामगिरी. ‘गुणवत्ता नियंत्रण कक्ष’ हा नावापुरता उपक्रम प्रत्यक्षात कामाचा दर्जा खालावलेला, खर्च मात्र वाढलेला.महापालिका हस्तांतरण प्रक्रियेतील मुद्दे न सोडवता राजकीय शोबाजी आणि फोटोंचा खेळ सुरू.शहरातील रस्त्यांची दुरवस्था वाढल्यावरही जबाबदार विभागांवर शून्य कारवाई.

ॲड. मातेले यांनी स्पष्ट इशारा दिला.“मुंबईकरांच्या पैशाचा हिसका चालवणारी सरकार कंत्राटदारांची साखळी आम्ही उघड करणार. जनतेसाठी काम नव्हे; तर कंत्राटांसाठी राजकारण हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

13 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

13 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

16 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

19 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

19 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

20 तास ago