महाराष्ट्र

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे…

नागपूर: शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. त्यावर अधिक माहिती देताना दानवे म्हणाले की, शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे.

शालेय पोषण आहाराचे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचे ७० टक्के अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत. मात्र आता डिसेंबर महिना संपत आला असून ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान कधीपर्यंत देण्यात येईल असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

तसेच नागपूर शहरात तांदूळासंदर्भातील गैरव्यवहार झाला आहे त्यावर फौजदारी कारवाई कधी होणार असा सवाल देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देताना म्हटले की, शालेय पोषण आहार संदर्भात प्रलंबित अनुदान हे इंधन व भाजीपाल्याबाबत आहे. संबंधितांना कंत्राटदार यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने त्यांना बिल पास करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सवलत दिली आहे.

शालेय पोषण आहाराचे अनुदान देण्यात येईल. तसेच यापुढेही या वर्गाला प्राथमिकता देण्यात येईल. नागपूरमधील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी संबंधित बचतगटाला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. तसेच त्यावर पोलीस आवश्यकतेनुसार कारवाई करत असल्याची माहिती दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

6 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

7 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

7 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

7 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

8 तास ago