महाराष्ट्र

पीएम किसान योजना! 22 व्या हप्त्यापुर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष 22ऱ्या हप्त्याकडे लागले असून, हा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC), आधार लिंकिंग किंवा बँक खात्यातील त्रुटींमुळे हप्ता मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे 22रा हप्ता मिळणार की नाही, हे आधीच तपासणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हप्ता येणार की नाही? असा तपासा PM Kisan Status

PM Kisan योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी खालील सोपी प्रक्रिया आहे 

सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवर दिलेल्या Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर Beneficiary Status / Status या पर्यायावर क्लिक करा.

येथे तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि सिक्युरिटी कोड भरा.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.

OTP टाकल्यानंतर तुमचा PM Kisan स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

‘Payment Pending’ किंवा ‘e-KYC not done’ दिसत असल्यास काय करावे?

जर स्टेटसमध्ये “Payment Pending” किंवा “e-KYC not done” असे दिसत असेल, तर तात्काळ संबंधित प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा हप्ता थांबवला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार

PM Kisan योजना ही देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. शेती संकटाच्या काळात ₹2,000 चा प्रत्येक हप्ता अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत घोषणांवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

5 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

5 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

5 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

5 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

7 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

8 तास ago