महाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची पेट्रोल डिझेलबाबत मोठी घोषणा!

मुंबई: भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज पहाटेपासूनच राष्ट्रीय उत्सवाची देशभरात धू असून यंदाचा हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीने तयारी केली. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकावला. ते सध्या बोलत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आज मिशन ग्रीननुसार, भारत अणुऊर्जेवर पुढाकार घेत आहेत. दहा नवे रिअॅक्टर गतीने काम करत आहेत. २०४७ पर्यंत भारत विकसित होईल हे ध्येय आहे. बदल ही निरंतर प्रक्रीया असून बदल करावेच लागतात. परमाणू ऊर्जेचे द्वार उघडले असून शक्तीशाली होत आहे.

पंतप्रधानांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,आम्ही २०२३० पर्यंत क्लिन एनर्जी ५० टक्क्यांपर्यंत वाढवणार आहोत, हा संकल्प आम्ही पुर्ण केले, हे ध्येय आम्ही २०२५ च्या आतच आम्ही हे ध्येय साकारले. कारण विश्वाप्रती, निसर्गाप्रती आम्ही जबाबदार आहोत. पेट्रोल, डिझेल गॅस साठी लाखो करोडो रुपये खर्च होत असे पण आता आपण ऊर्जेवर स्वंयपूर्ण झालो आहोत, हा पैसा वाचत असून हा खर्च आत्मनिर्भरता आणि देशाला विकसित करण्यासाठी वापरत आहोत. समुद्रमंथन आम्ही पुढे नेत आहोत, आणि समुद्रातून तेल, नैसर्गिक साठे शोधण्यासाठी मिशन मोड तयार करत आहोत, नॅशनल डीप वाॅटर अॅस्पेरिशन मिशन आपण सुरु करत आहोत. ही महत्वपुर्ण घोषणा आहे.

मेड इन इंडियाचा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शुभांशु शुक्ला यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. १४० कोटी भारतवासी २०२४७ साली विकसित भारताचे संकल्प पुर्ण करणार आहे. या संकल्पासाठी भारत सर्व क्षेत्रात आधुनिक इकोसिस्टीम तयार करत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण याद्वारे आत्मनिर्भर बनू. देशातील युवा, अभियंते, वैज्ञानिकांना, सरकारच्या विभागाला आवाहन आहे की, मेड इन इंडिया, फायटर जेटसाठी आपले इंजिन हवे असे म्हटले. आपण फार्मा सेक्टर, लस संशोधनात आपण अग्रेसर आहोत, आपले स्वतःचे पेटंट असावे, नवीन औषधी संशोधन असावे हे मानवजातीच्या कल्याणासाठी कामी येईल.

युपीआयचा जगात डंका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशाचे भाग्य बदलायचे असेल तर युवकांचे आणि सर्व क्षेत्रातील लोकांची मदत हवी. सध्याचे जग आयटीचे आहे. एआय ते सायबर सुरक्षा आणि सर्व आयटी क्षेत्राला हवे ते सारे आपले असावे हे ध्येय आहे. आपण जगाला युपीआयचा प्लॅटफाॅर्म दाखवला. रियल टाईम ट्रान्झेक्शनमध्ये ५० टक्के योगदान जगात भारताचे आहे. भारताचा पैसा बाहेर जाऊ नये यासाठी आपण आता स्वावलंबी बनवूया.

इव्हीचे युग, आपल्याच, बॅटऱ्या खतं हवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक खतासह भारतीय नवीन संशोधनात्मक खतांचा उपयोग आपण काळ्या आईला समृद्ध करुया. नवीन संशोधन करुन आपण आपले खतं तयार करुया. हे जग इव्हीचे आहे आपणच बॅटऱ्या तयार करायला हव्या, कारण आपले तरुण खूपच गुणवाण आहे त्यांच्या सामर्थ्यावर मला विश्वास आहे.

इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला कैक वर्ष लागली तब्बल दिडशे वर्षांपेक्षा जास्त इंग्रजांनी देशावर सत्ता गाजवली. या सत्तेविरुद्ध भारतीय शूर स्वातंत्र्यसेनानींनी लढा दिला आणि इंग्रजी सत्ता झुगारुन दिली. त्यांच्या बलिदानामुळे आजचा दिवस आपण पाहत आहोत. त्या सर्वांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवणार आहेत. हा रेकाॅर्ड होणार आहे. कारण आतापर्यंत काँग्रेसशिवाय अन्य पक्षाचे कोणतेही पंतप्रधान हा विक्रम करु शकले नाहीत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago