महाराष्ट्र

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: “नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी राज्यभर नेत्रदान जनजागृती उपक्रम आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मंत्रालय, मुंबई यांच्या माध्यमातून राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती केली जाणार आहे. समाजातील दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना नव्या आशा देण्याचे सामर्थ्य नेत्रदानामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ३३ अनुदानित विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ५६६ महाविद्यालयांमध्ये तसेच ३४ विनाअनुदानित विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १४७ महाविद्यालयांमध्ये १० जून रोजी नेत्रदान जनजागृती कार्यक्रम व नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

“नेत्रदान करा, जीवन उजळवा” हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण केली जाणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः सहभागी होऊन समाजातील इतरांनाही या कार्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

10 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

17 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

17 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

17 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

17 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

18 तास ago