महाराष्ट्र

संत गाडगे महाराज यांचा जीवन संदेश आचरणात आणणे काळाची गरज; महापौर रितू तावडे

मुंबई: संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवारा या सेवाकार्यांवर दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचा जीवन संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले.

संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स – एस. गेरगे हॉस्पिटल परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेत सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “येथील सेवाभावी उपक्रम पाहून मी प्रभावित झाले आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छतेचे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून, नगरसेवक व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्यास स्वच्छतेत आपण नवा उच्चांक गाठू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेमार्फत आयोजित स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये भविष्यात सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान महापौरांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजश्री कटके, गजाननराव नागे, संस्थेचे एकनाथ ठाकूर, उत्तमराव लोणारकर, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

6 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

6 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

11 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

11 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

11 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

11 तास ago