महाराष्ट्र

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’! शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकारणाचा थरार ६ फेब्रुवारीपासून रुपेरी पडद्यावर

मुंबई: मराठी ऐतिहासिक चित्रपटसृष्टीत आणखी एक भव्य आणि उत्कंठावर्धक पर्व दाखल होत असून, ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आणि ऐतिहासिक आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ एक कथा नसून, शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय मांडतो.

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. भव्य सेट्स, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी पटकथेच्या जोरावर हा चित्रपट इतिहास जिवंत करत असल्याचं चित्र दिसत आहे.

या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सर एका अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली व्यक्तिरेखेत दिसणार असून, त्यांच्या भारदस्त आणि अनुभवी अभिनयामुळे या भूमिकेला एक वेगळंच परिमाण लाभलं आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ सत्तेचं प्रतीक नसून, कूटनीती, रणनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.

महाभारत मालिकेतील दुर्योधन या गाजलेल्या भूमिकेसह अनेक संस्मरणीय पात्रांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या चित्रपटातून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसणार आहेत.

सशक्त कलाकारांचा अभिनय, भव्य दृश्यरचना आणि ऐतिहासिक घटनांची ताकदीने मांडणी यामुळे ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार असल्याचं चित्रपटप्रेमींमध्ये चर्चेत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

9 मिनिटे ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

12 मिनिटे ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 मिनिटे ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

26 मिनिटे ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

2 तास ago