मनोरंजन

ज्ञानदा रामतीर्थकर–हर्षद आत्माराम! साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच नात्याविषयी स्पष्ट खुलासा

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकताच ज्ञानदाचा हर्षद आत्माराम याच्याशी साखरपुडा पार पडला असून, या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच सविस्तरपणे भाष्य केलं आहे.ज्ञानदा आणि हर्षद यांनी राजश्री मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या प्रेमकथेमागची वाटचाल, घरातून होकार मिळवण्यासाठी केलेली प्रतीक्षा आणि त्यामागची कारणं उलगडली.

ज्ञानदा म्हणाली,“हर्षदने त्याच्या घरी आधीच सांगितलं होतं. मी मात्र घरी सांगायला थोडा वेळ घेतला. बाहेरून काहीही कळू नये, आपणच योग्य वेळी सांगायचं, हे दोघांचं ठरलेलं होतं. दोन्ही कुटुंबांचा पूर्ण होकार मिळाल्याशिवाय लग्न करायचं नाही, हे आम्ही ठामपणे ठरवलं होतं.”हर्षदनेही या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली.

“या लग्नासाठी कुणीतरी मनापासून तयार नाही, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे आम्ही घाई न करता खूप संयम ठेवला. शेवटी सगळं जुळून आलं.”साखरपुड्याच्या प्रसंगाविषयी बोलताना ज्ञानदाने भावनिक आठवण सांगितली.“अंगठी घालताना आई शांत होती, पण बाबा मात्र रडत होते. त्या क्षणी हर्षद त्यांना समजवायला गेला. बाबांनी मला सांगितलं होतं‘अजून वेळ घे, फायनल ठरेल तेव्हा सांग, हर्षदनेही यावेळी पाठिंबा दिल्याचं सांगितलं.“जोपर्यंत सगळे तयार होत नाहीत, तोपर्यंत लग्न करायचं नाही. तोपर्यंत करिअरवर आणि सेटल होण्यावर लक्ष द्यायचं, असं आम्ही ठरवलं.”

ज्ञानदाने स्पष्ट केलं की तिच्या आई-वडिलांना या नात्याला होकार द्यायला दोन वर्षांचा कालावधी लागला. यामागचं कारण सांगताना हर्षद म्हणाला,“आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये सांस्कृतिक फरक आहे. समाजाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. पण माझ्यासाठी महत्त्वाचं हे होतं की माणूस म्हणून आपण योग्य आहोत का? जात हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता, मात्र काही लहानसहान गोष्टींवर चर्चा झाली.”संयम, समजूतदारपणा आणि परस्पर आदराच्या जोरावर ज्ञानदा–हर्षदचं नातं अधिक भक्कम झालं असून, त्यांच्या प्रामाणिक भूमिकेचं चाहते कौतुक करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

19 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

19 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

19 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

21 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago