महाराष्ट्र

महायुती सरकारची विक्रमी कामगिरी; विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी निर्णय घेतले आहेत. विरोधकांनी बहिष्काराचे राजकारण सोडून सभागृहात येऊन विधायक चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी कर्जमाफी, शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, उद्योग गुंतवणूक, मेट्रो, विमानतळ, महामार्ग, बंदरे आणि गृहनिर्माण क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.

शिंदे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान आणि नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली आहे. “सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे,” असे ते म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना पुढेही मिळत राहील, असे स्पष्ट करत त्यांनी योजना बंद होणार नसल्याचे सांगितले. नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांवरच कारवाई सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक, विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि विविध महामार्ग प्रकल्पांचा उल्लेख केला. राज्यात 90 हजार कोटी रुपयांच्या उद्योग गुंतवणुकीला चालना मिळाल्याने हजारो रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, अधिवेशन हे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार असून विरोधकांनी सभागृहात येऊन जनहिताच्या विषयांवर चर्चा करावी.

“आम्ही खुर्चीला नव्हे तर विकासाला प्राधान्य दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांना विधायक सहकार्याचे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार; सरकारवर शेतकरी, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारावरून हल्लाबोल

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकण्याची घोषणा…

2 तास ago

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक…

4 तास ago

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; ग्रॅच्युईटी, वेतनवाढ आणि ५ हजार नव्या बसांचा निर्णय

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने…

4 तास ago

जेसीबीच्या काचा फोडून १० हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड…

18 तास ago

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

2 दिवस ago