१६ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या उसाला प्रतिटन १०० रुपये अनुदान
बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या उसाला (आडसाली, सुरू, पूर्वहंगामी व खोडवा) प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. कार्यक्षेत्रातील आडसाली उसाचे वाढलेले क्षेत्र आणि ऊस तोडीस होणारा विलंब लक्षात घेऊन सभासदांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या उसाला सभासदांना एकूण ३२०१ रुपये प्रतिटन दर मिळणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ यांच्यासह कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि जनरल मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.
दरम्यान, जळीत ऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याने साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याचे सांगत, १६ जानेवारीपासून जळीत उसास प्रतिटन २०० रुपये नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे.
कारखान्याचे ऊस गाळप व साखर उतारा वाढल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, “माझा कारखाना, माझी जबाबदारी” ही भावना ठेवून सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…