महाराष्ट्र

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा

१६ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या उसाला प्रतिटन १०० रुपये अनुदान

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या उसाला (आडसाली, सुरू, पूर्वहंगामी व खोडवा) प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. कार्यक्षेत्रातील आडसाली उसाचे वाढलेले क्षेत्र आणि ऊस तोडीस होणारा विलंब लक्षात घेऊन सभासदांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या उसाला सभासदांना एकूण ३२०१ रुपये प्रतिटन दर मिळणार आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ यांच्यासह कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि जनरल मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.

दरम्यान, जळीत ऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याने साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याचे सांगत, १६ जानेवारीपासून जळीत उसास प्रतिटन २०० रुपये नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे.

कारखान्याचे ऊस गाळप व साखर उतारा वाढल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, “माझा कारखाना, माझी जबाबदारी” ही भावना ठेवून सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! सणसवाडीत सहकाऱ्याने गुदद्वारात घातला कॉम्प्रेसरचा पाइप अन्…

शिरूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम सुरू असताना सहकाऱ्यानेच दुसऱ्या…

25 मिनिटे ago

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण…

13 तास ago

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या…

13 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

13 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

13 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

13 तास ago