मुंबई: उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14 जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंड राज्यातील गाढवाल ; कुमाव या जिल्ह्यातील ग्रामपंचायत ; जिल्हा परिषद ; नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे.
गढवाल भागात रिपब्लिकन पक्षाचे 4 ग्राम प्रधान निवडून आले आहेत. कुमाव क्षेत्र येथे 1 ग्राम पंचायत आणि 4 जिल्हा परिषद सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत. उत्तराखंड च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे.आगामी काळात रिपब्लिकन पक्ष उत्तराखंड सहित संपूर्ण उत्तर भारतात विजयी घोडदौड करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
विधानसभा जिंकण्याचा रस्ता हा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतील विजयावर अवलंबून असतो.त्यामुळे विधानसभा जिंकून देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वाच्या आहेत.त्यात रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा रिपब्लिकन पक्षाच्या उत्तराखंड मधील पुढील वाटचालीसाठी महत्वाचा आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…