महाराष्ट्र

वॉटरग्रेस कंपनीला जैविक कचरा जमा करण्याची दिलेली मुदतवाढ रद्द करा; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती संभाजीनगर येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्यासाठी नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनी ला गेल्या २० वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देऊन तिला मुदतवाढ दिलेली आहे, ती रद्द करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषद सभागृहात केली.

तसेच तिथे अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. सदर एजन्सीचे काम हे संथगतीने सुरू असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसविल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे सदर कंपनीला दिलेली मुदतवाढ रद्द करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सदर एजन्सीच्या कामाच्या ठिकाणी पाहणी व तपासणी न करता क्लीनचिट दिली त्याबाबत उच्चस्तरिय चौकशी करावी, अशीही मागणी दानवे यांनी केली.

ही एजन्सी अनेकदा बायो मेडिकल वेस्ट पुन्हा वापरत असल्याच्या घटना उघडकीस आल्या असून तिच्या कामकाजाचा अनुभव शहरासाठी अत्यंत वाईट आहे.या संबंधित पुरावेही माझ्याकडे असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. सदरील विषयाप्रकरणी विभागीय आयुक्त मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

4 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

4 तास ago