मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत सहाव्या हप्त्यासह काही थकीत हप्त्यांचे वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून, त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शासनाचा महत्त्वाचा निर्णय
शेतकरी मित्रांनो, मागील काही महिन्यांपासून ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. याआधी केवळ ‘पीएम किसान’ योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र ‘नमो’ योजनेच्या निधीची वाट पाहावी लागत होती. आता शासनाच्या नव्या आदेशानुसार, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर झाला आहे आणि लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
2000 रुपये खात्यात कधी जमा होणार
शासनाच्या अधिकृत आदेशानुसार, मंजूर निधीचे वाटप लवकरच सुरू होईल.
शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासावीत आणि हप्त्यासाठी तयार राहावे.
हप्ता मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी हा हप्ता का महत्त्वाचा
यंदा हवामानातील अनियमित बदलांमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
थकीत हप्त्यांचे वितरण केल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या पुढील कामांसाठी आर्थिक मदत मिळेल.
राज्य शासनाने यंदा 653.50 कोटी रुपयांची अतिरिक्त थकबाकी मंजूर केली असून, याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
तुमचे बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करा.
नमो शेतकरी सन्मान योजने’साठी तुम्ही पात्र आहात का, याची खात्री करा.
हप्ता जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवर एसएमएस येईल, तो तपासा.
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…