मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्र अभिवादन केले.
यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी राज्यातील नागरिकांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.
“होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख, समाधान, ऐश्वर्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो,” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…