मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्र अभिवादन केले.
यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी राज्यातील नागरिकांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.
“होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख, समाधान, ऐश्वर्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो,” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…
सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…
मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…
शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…