धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मंगळवारी न्यायालयाबाहेर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दोन्ही गटांचे नेते माध्यमांशी संवाद साधण्यासाठी न्यायालयाबाहेर आले होते. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत, तर एकनाथ शिंदे गटाकडून नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी पत्रकार आणि कॅमेऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांनी नरेश म्हस्के यांना आमनेसामने चर्चा करण्याचे आव्हान दिले. मात्र, म्हस्के यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर राऊत यांनी त्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाई यांना म्हस्के यांना बोलावून आणण्यास सांगितले.
अनिल देसाई म्हस्के यांच्या दिशेने गेले. मात्र, म्हस्के तेथून निघून गेले. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे पाहत, “अरे ये ना, यावंच लागणार आहे ना!” अशा शब्दांत म्हस्के यांना आवाज दिला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर कोणाचा दावा योग्य, याबाबत सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. मागील दोन-अडीच वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी रखडली होती. आता सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. मागील आठवड्यापासून सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे न्यायालयातील सुनावणीसोबतच दोन्ही गटांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही पुन्हा धार आली आहे.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…
शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…
सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार…
पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी…
मुंबई : टाटा समूहाबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन…
मुंबई : आकाशप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार…