महाराष्ट्र

सात जन्म ही पत्नी नको म्हणत घातले साकड…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्री पौर्णिमेपूर्वी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. पिंपळाला ७ फेरे मारून कायद्याचा दुरुपयोग करून पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी, आयुष्य उध्वस्त करणारी पत्नी यापुढे नको अशी प्रार्थना केली.तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडे घालण्यात आले.

या वेदनेमागे काय होत. चला जाणून घेऊया

मुख्य आरोप आणि वेदना

कायद्याचा गैरवापर: पुरुषांनी सांगितलं की महिला सबलीकरणाच्या नावाखाली बनवलेले अनेक कायदे आता पुरुषांविरुद्ध वापरले जात आहेत.

खोट्या तक्रारी: काही महिला खोट्या तक्रारी करत पतीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देतात.

समान न्यायाची मागणी: पुरुष व महिला असा भेद न करता, कायद्याने दोघांनाही समान न्याय मिळायला हवा, ही मागणी होती.

अहवालात उघड झालेलं वास्तव

नवी दिल्लीतील NCRB रिपोर्ट (2024) नुसार:

2023 मध्ये तब्बल 1.20 लाख विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली. ही संख्या विवाहित महिलांच्या आत्महत्येपेक्षा तब्बल 3 पट अधिक होती. हे आकडे पुरुषांवरील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दबावाचे गंभीर वास्तव मांडतात.

व्यवस्थेकडून अपेक्षाभंग

2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 498A च्या गैरवापरावर आळा घालण्याचे निर्देश दिले होते. तरीही अनेकदा स्थानिक पोलीस महिलांच्या तक्रारी ऐकून थेट पतीला अटक करतात, असा आरोप करण्यात आला.

सामाजिक बदलाची गरज

पुरुष हा केवळ एक पती नव्हे, तर कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे संपूर्ण कुटुंबव्यवस्थेला अंधारात ढकलणं.

जसं महिलांसाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या, तसंच आता पुरुषांच्या हक्कांसाठीही आवाज उठवायला हवा. कायद्यात योग्य बदल व्हावेत, समाजाने पुरुषांचंही दु:ख ऐकावं आणि त्यांच्या बाजूनेही उभं राहाव. हीच खरी गरज आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

10 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

19 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

19 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

20 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago