मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा सुरू झाल्याने जगभरातील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग बंद झाल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत तेलवाहू जहाजे आणि कंटेनर जहाजांसह तब्बल 26 व्यापारी जहाजांना होर्मुज खाडीतून सुरक्षित मार्ग देण्यात आला. काही दिवसांपासून या मार्गावर मोठा तणाव निर्माण झाला होता. अनेक जहाजे खाडीत प्रवेशासाठी प्रतीक्षेत होती, तर काही जहाजांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
होर्मुज खाडी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि एलपीजी गॅस याच मार्गातून विविध देशांमध्ये पोहोचते. त्यामुळे या मार्गावरील तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवत असून भारतालाही त्याचा फटका बसत आहे.
भारतासह अनेक देशांनी पर्यायी मार्ग आणि अतिरिक्त तेलसाठ्यांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तणाव कायम राहिल्यास इंधन दरवाढ आणि महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. पाकिस्तानमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून काही भागात लॉकडाऊनसदृश स्थिती असल्याचे वृत्त आहे. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.होर्मुज खाडीतून पुन्हा जहाजांची हालचाल सुरू होणे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब मानली जात असली तरी परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…
२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…
किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…
पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…