मुंबई: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य मानून सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सुनेत्रा पवार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पीएमआरडीए, जिल्हा परिषद तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदत, सुरक्षित स्थळी स्थलांतर, निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पूर, भूस्खलन आणि धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाबाबत वेळेवर एसएमएस, सोशल मीडिया आणि स्थानिक यंत्रणांमार्फत नागरिकांना सतर्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभागाने समन्वयाने बचावकार्य करावे, तसेच कोणताही अधिकारी मुख्यालय सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बंद रस्ते, पूल आणि घाटांवर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू, जखमी आणि नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत देण्यासही सांगण्यात आले आहे.
वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच प्रत्येक दोन तासांनी परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देत आयटी पार्क आणि औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीकाठ आणि नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन करत भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी अतिदक्षतेचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…
२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…
किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…
पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…