महाराष्ट्र

एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम; १० लाखांवरील उत्पन्नधारकांना अनुदान बंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांना यापुढे गॅस सिलिंडरवरील अनुदान मिळणार नाही.सरकारच्या मते, अनुदानाचा लाभ केवळ गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, बनावट, निष्क्रिय आणि मृत व्यक्तींच्या नावावरील गॅस कनेक्शनवरही कारवाई केली जाणार आहे.

मृत व्यक्तीच्या नावावरील गॅस कनेक्शनबाबतही सरकारने स्पष्ट नियम लागू केले आहेत. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाने ३० दिवसांच्या आत कनेक्शन पात्र सदस्याच्या नावावर हस्तांतरित करणे आवश्यक असेल. तसे न केल्यास ते कनेक्शन बंद करण्यात येईल.याशिवाय, दीर्घकाळ वापरात नसलेली आणि बनावट गॅस कनेक्शन कायमची बंद करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. अनुदानातील गैरव्यवहार रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि तरीही सबसिडी मिळत नाही, अशा ग्राहकांनी काही बाबी तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँक खाते गॅस कनेक्शनशी लिंक आहे का, आधार कार्ड जोडले आहे का आणि KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.ग्राहकांना त्यांच्या सबसिडीची स्थिती My LPG Portal किंवा संबंधित मोबाईल अॅपवर तपासता येणार आहे. समस्या कायम असल्यास संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधण्याचा किंवा पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ४० हजारांहून अधिक उच्च उत्पन्न गटातील ग्राहक एलपीजी सबसिडीचा लाभ घेत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने अनुदान वितरणाचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.सरकारच्या मते, या बदलांमुळे अनुदान व्यवस्था अधिक पारदर्शक होईल आणि खऱ्या अर्थाने गरजू नागरिकांपर्यंत लाभ पोहोचण्यास मदत होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

FDA चा कृत्रिम दूध भेसळीच्या राज्यव्यापी रॅकेटवर मोठा घाव; पाच जिल्ह्यांत एकाच वेळी छापे

१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३…

17 तास ago

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…

21 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच…

22 तास ago

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…

1 दिवस ago

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…

1 दिवस ago

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…

1 दिवस ago