महाराष्ट्र

रणसंग्राम महानगरपालिकांचा! भाजपला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले?

शिरूर (नितीन थोरात): राज्यातील 29 महापालिकांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असताना भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे. मतदारांनी दिलेला कौल मुंबई – पुणे सह अनेक ठिकाणी भाजप या पक्षाला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले? याचे वैचारिक मंथन करणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी पाहिले आहे की, एकूणच देशातील अनेक राज्य असतील किंवा एकूणच केंद्रात स्थापन झालेले एनडीए सरकार जे भाजप पक्षाच्या बळावर उभे राहिलेले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाच्या सोबत सहभागी झालेली महायुती यामध्ये सामील असलेले प्रादेशिक पक्ष. ही परिस्थिती निर्माण होण्यामागे नेमकी कारणे कोणती? याबाबत समाजामध्ये अनेक चर्चा ऐकताना आपण पाहतो यामध्ये स्थलांतरित झालेले नेते कदाचित ईडीच्या चौकशीला जाण्याच्या भीतीने? की सत्तेत सामील होण्याच्या अभिलाषेमुळे? या पक्ष स्थलांतराची नेमकेपणाने मिमांसा करणे तसे कठीणच आहे. पण या घटनेमुळे निश्चितपणे ज्या प्रमाणात विरोधी पक्ष हवा तेवढा बळकट होण्याऐवजी कमकुवत झालेला आपण पाहतो आहोत. भाजप पक्षाची सत्ता नसताना जे दिग्गज नेते सत्तेत पाहत होतो. तेच भाजप पक्षात सामील झाले. यामध्ये राष्ट्रीयपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षालाही अनेक दिग्गज नेत्यांनी राम राम का ठोकला? याच बरोबरीने प्रादेशिक पक्ष असलेल्याही नेत्यांनी तेच करावे?

यामुळे फक्त सत्तेतला पक्ष बदलला माणसे मात्र जुनीच असल्याचे दिसते. यातच सरकारने ज्या योजना समाजासाठी आणल्या त्यामुळे नेमका फायदा कोणाचा झाला? सरकारचा? की, जनतेचा? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. ज्या योजनांमुळे आपण समाधानी आहोत अशा लाडक्या बहिणींचा फायदा आपल्यालाच होतो आहे. असे वरवर तरी दिसत आहे. यामुळेच कदाचित भाजप पक्षाला समाधान वाटणे साहजिक आहे. ज्यांनी निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मागील अनेक दशके वर्षानुवर्ष समाजाशी आपली नाळ जोडली होती ती नियमितपणे अखंडपणे ते समाजाच्या मनात उतरलेले नेतृत्व यांना आपण ज्या पक्षात आपली इतकी वर्षाची मेहनत करत आहोत. त्याकरिता कदाचित आपण आहोत या ठिकाणी अडचणीत तर नाही ना? सत्तेत असलेल्या पक्षाकडून आपल्या भूतकाळातील काही योग्य, अयोग्य प्रकरणात गुंतवले गेलो तर? आपल्यालाही जामीन नसलेल्या तुरुंगात टाकणार तर नाहीत? “वैरी न चिंती ते मनचिंती” अशा विचारांच्या वादळाने अनेकांनी पक्ष स्थलांतराचे निर्णय घेतले असावेत का?

याच सर्व गोष्टींचा विचार करता एकेकाळी याच पक्षाला उमेदवार शोधावे किंबहुना मिळत नव्हते त्या ठिकाणी आर्थिक गोष्टीचे तगडे उमेदवार आणि त्यांची समाजात असलेली कार्यकर्त्यांची फौज आयतीच मिळाल्याने या पक्षाची घोडदौड जोरात सुरू झाली यात नवल ते काय? याच निवडणुकीत एकूणच झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिलीत तर ही लोकशाही नेमकी मतावर चालते? की पैशावर? आपणच ठरवा आणि विचार करा
मी मतदान करतो?
मी बेजबाबदारपणे मतदान प्रक्रियेत भागच घेणे टाळतो?
मी माझं मत उच्च भावात?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

14 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

14 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

18 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

18 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

19 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

19 तास ago