सर्व जातींना समान संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची; डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई: “वेगवेगळ्या जातींना समान पद्धतीने विकासाच्या संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी आणि विशेष संधी सर्वांपर्यंत पोहोचली का, याचे मूल्यमापन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची आहे,” असे म्हणत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.
केंद्र सरकारने नुकतीच जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे शिवसेनेतर्फे मनापासून स्वागत करण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “ही जनगणना केवळ आकडेवारीसाठी नसून, देशाच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक समाजघटकाचा सहभाग आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जातीसंस्थेला विरोध लक्षात घेऊन ही प्रक्रिया राबवली तर, ती वास्तव माहितीच्या आधारे समाजहितासाठी दिशादर्शक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…