आरोग्य

शरीराचा नाजुक अवयव डोळा

डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणका समोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की, मग एकतर चष्मा डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी त्रास घ्यावा लागतो. म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच आपण काही घरगुती उपाय करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो.

गुलाबजल थंड असल्यामुळे सहाजिकच ते डोळ्यांसाठी प्रभावी मानले जाते. तसं तर गुलाबजल हे मुड फ्रेश करणे, कांती उजळणे, त्वचा मुलायम करणे अशा अनेक गोष्टीत लाभदायक ठरते. गुलाबजलचा वापर केल्याने दृष्टी वाढण्यासही मदत होते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्यात गुलाबजलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे किंवा काळे डाग कमी करण्यासाठी देखील गुलाबजलचा वापर करू शकता.

मोहरीचे तेल डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास लाभदायक ठरते. पायाला तळव्यावर १० मिनिटे मोहरीच्या तेलाने मसाज करावी. असे केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.

नियमित व्यायाम करणाऱ्या आणि वजन नियंत्रित ठेवणाऱ्यांची दृष्टी ही सामान्य लोकांपेक्षा अधिक चांगली असते. वजन वाढल्यामुळे डायबिटीज-२ (मधुमेह) असलेल्या लोकांची दृष्टी कमजोर होत जाते. याच कारणामुळे नजर साफ असण्यासाठी सर्वात आधी वजन नियंत्रित असणं गरजेचं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि दृष्टीत अनेक सकारात्मक बदल घडवू शकता.

बदामाने स्मरणशक्ती वाढते, कांती उजळते आणि यासोबतच अनेक लाभ होतात. बदामाच्या सेवनाने डोळ्यांची नजर देखील वाढते. बदामात व्हिटॅमिन-ए मोठ्या प्रमाणात आढळते. दररोज दुधात बदामाची पुड टाकून त्याचे सेवन करावे. असे केल्याने दुध आणि बदाम असे दोन्हीतील व्हिटॅमिन-ए मिळतील आणि डोळ्यांची दृष्टी अधिक बळकट होण्यास मदत होईल.

आवळ्यातील ॲंटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवण्याचे काम करतो. डोळ्यांतील पडदा निरोगी राहिल्याने दृष्टी देखील चांगली राहण्यास मदत होते.

गाजर, अक्रोड, ब्रोकोली, पालक या भाज्यांचा आणि फळांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांचा आहारात समाविष्ट करुन डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

20 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

20 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

20 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

20 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

20 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

20 तास ago