महाराष्ट्र

ट्राफिक पोलिसांच धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद…

सोलापूर: सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून 2 ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारु पाजली. राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली सोलापूर शहरात आधीच वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील ट्राफिक विभाग वाहतुकीबाबत कोणतेही धोरण राबवत नाही.
शहरातील प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत असतात. अनेकदा लोक नियमाप्रमाणे दंड भरण्याऐवजी चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वाहन चालकाला तिथे उपस्थित असलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाची माहिती दिली. मात्र, शेवटी चिरीमिरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आलं.
आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली. ट्राफिक पोलीस अशाप्रकारे चिरीमिरी घेत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बनावट सह्या करून 46 लाखाची फसवणूक, असा उघड झाला ठाण्यातील विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा डाव आधी वाहतुकीचे नियम मोडले तर ट्राफीक पोलीस पावती फाडायचे. त्यासाठी रोख रक्कम घेतली जायची. हे पैसे घेताना चिरीमिरी देऊन वाहनचालक मोठ्या दंडातून सुटका करुन घ्यायचे.
मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले आणि वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला. मग डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही ट्राफिक विभागातील काहीजण चिरीमिरी घेत असल्याचं समोर येत आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

2 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

2 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

2 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

19 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

19 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

19 तास ago