महाराष्ट्र

दक्षिण मुंबईमधील गिरगावात स्थिरावली श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स एक आदर्श वसाहत

तळेरे: मुंबई मधील दक्षिण मुंबईत एक नव्या रूपाने श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स ही अत्यंत आदर्श वसाहत प्रस्थापित झाली आहे. सदर वसाहतीमधील पहिलाच गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात सामाजिक भान ठेवून साजरा झाला. ज्यामध्ये डॉक्टर, व्यापारी, स्थापत्य विशारद, नृत्य विशारद यांनी अध्यक्ष श्री. संजय मुरकुटे ह्यांचे मार्गदर्शनाने एकदिलाने स्वतः झोकून दिले होते.

या कार्यक्रमास स्वा. वीर सावरकर चरित्र गायक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र सतीश भिडे ह्यांनी आपल्या सहकारी मंडळींचे साथीने अखंड भारत निर्मितीसाठी गीत वीर विनायकचा तुफानी कार्यक्रम सादर केला.

जेष्ठ समन्वयक रत्नेश भावसार, सुशांत चाचड, निनाद भावे, मेहुल घोसाळकर, प्रसाद दाते, देवदत्त शिरोळकर, केदार वैद्य, सिद्धेश वेदपाठक, हर्षद वैद्य, जेष्ठ गायिका सौ. मंजुश्री देवधर, स्मिताताई दारशेतकर, समीक्षा दारशेतकर, सुरक्षा शिरोळकर, सामाजिक युवा नेता परेश मोघे, दिपा घोसाळकर, विकीता चाचड, डॉ. जितेंद्र कानिटकर, सुरेश शहा, राजेशजी गंगाखेडकर, मनीष परमार, कमल पोळे, केदार जोशी, अमित मोने ह्यांनी एकदिलाने कार्यास स्वतःस झोकून दिले होते.

सदर वसाहतीस जेष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा व विनोद तिवारी ह्यांनी दिलेल्या भेटीमुळे व वेदाचार्य श्री. श्रीराम देवधर ह्यांच्या वेद पठनाने गणेश भक्त आनंदले होते. सदरची वसाहत ही ह्या बहुआयामी व्यक्तींच्या परिश्रमाने कौतुकाचा विषय झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

1 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

1 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

1 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

12 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

13 तास ago