आरोग्य

एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

आजच्या डिजिटल युगात लोक तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. तासंतास एकाच जागी बसून काम करतात. काम करताना तर काही वाटत नाही, पण नंतर काही काळानं अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. सोबतच या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावं हेही त्यांनी सांगितलं.

जास्त वेळ बसून काम करण्याचे नुकसान

कंबर आणि मानदुखी

सतत एकाच जागी बसून काम केल्यानं पाठ, मान आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये तणाव वाढतो. त्यामुळे या अवयवांमध्ये वेदना होतात. तसेच चुकीच्या पोश्चरमध्ये बसले तर मणक्यामध्येही समस्या होतात.

टाइप २ डायबिटीस

जेव्हा आपण सतत एकाच जागी बसून तासंतास काम करतो तेव्हा आपलं शरीर इन्सुलिनचा व्यवस्थित वापर करू शकत नाही. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते आणि टाइप २ डायबिटीसचा धोकाही अधिक वाढतो.

लठ्ठपणा वाढतो

दिवसभर जर शरीराची अजिबात हालचाल होत नसेल तर कॅलरी बर्न होत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबी जमा होते. नंतर पुढे लठ्ठपणा वाढतो आणि वजनही वाढतं. एकदा जर लठ्ठपणा वाढला तर वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

हृदयरोग

जास्त वेळ बसून राहणं हृदयाच्या आरोग्यासाठी देखील नुकसानकारक ठरतं. शरीराची हालचाल केली नाही तर कोलेस्टेरॉल वाढतं, ब्लश प्रेशर वाढतं. नंतर हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

काय कराल

दर तासाला ब्रेक घ्या

ऑफिसमध्ये काम करत असताना दर ३० मिनिटांनी किंवा ६० मिनिटांनी ब्रेक घ्या. २ ते ३ मिनिटांच्या या ब्रेकमध्ये थोडं चाला. शरीराची हालचाल करा. स्ट्रेचिंग करा. असं केल्यास आपल्याला फ्रेश वाटेल आणि वरील समस्याही टाळता येतील.

बाहेरचं खाणं टाळा

बरेच लोक ऑफिसमध्ये बाहेरचं जेवण मागवतात. एखाद्या वेळेस असं करणं ठीक आहे. पण जर नेहमीच असं करत असाल तर पुढे जाऊन मोठ्या समस्या होऊ शकतात. अशात रोज घरचं जेवणच केलं पाहिजे.

हायड्रेटेड रहा

ऑफिसमध्ये आपल्या डेस्कवर एक पाण्याची बॉटल न विसरता ठेवा. दिवसभर थोडं थोडं पाणी पित रहा. असं केल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि थकवाही दूर होतो.

मेंदुला आराम द्या

कामाच्या मधे छोटे छोटे ब्रेक घेतल्यानं मेंदुला आराम मिळतो. मेंदू शांत होतो. बसल्या जागी छोट्या अ‍ॅक्टिविटी करा. यामुळे तणाव कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

21 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

21 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

1 दिवस ago