महाराष्ट्र

तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांना गती; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा करार

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढविणे आणि वीज खर्चात बचत साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आणि MAHAPREIT यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या कराराअंतर्गत सौरऊर्जा, स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, ऊर्जा साठवण (Energy Storage) आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील वीज वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि इतर शासकीय संस्थांच्या इमारतींच्या छतांवर तसेच मोकळ्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प RESCO (Renewable Energy Service Company) मॉडेलद्वारे राबवले जाणार असून, यासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी MAHAPREIT कडून सर्वेक्षण, तांत्रिक अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाईल. तर तंत्रशिक्षण संचालनालय संबंधित संस्थांची माहिती, समन्वय आणि प्रशासकीय मंजुरीसाठी सहकार्य करणार आहे.

यासोबतच सौरऊर्जा व नूतनीकरणीय तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन तांत्रिक अभ्यासक्रम विकसित करणे, कौशल्यविकासाला चालना देणे आणि NABL मान्यताप्राप्त अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा उभारण्याचे कामही संयुक्तपणे करण्यात येणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या हरित ऊर्जा धोरणाशी सुसंगत असलेला हा करार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला गती देणारा ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

18 मिनिटे ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

5 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

5 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

5 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

6 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

6 तास ago