महाराष्ट्र

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कलीना (सांताक्रूझ पूर्व) येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री Mangal Prabhat Lodha, गृहराज्यमंत्री Yogesh Kadam, पोलीस महासंचालक Sadanand Date तसेच मुंबई पोलीस आयुक्त Deven Bharti उपस्थित होते.

उद्घाटनावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “सरकार हे केवळ आदेश देणारे नसून पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आहे.” पोलीस दलासाठी आधुनिक सुविधा, दर्जेदार घरे, सुसज्ज पोलीस स्टेशन, अत्याधुनिक शस्त्रे आणि सायबर सुरक्षेसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा स्पर्धेबाबत बोलताना त्यांनी या स्पर्धेला “महाराष्ट्र पोलीस महा ऑलिम्पिक” असे संबोधले. “प्रत्येक सहभागी खेळाडू हा विजेता आहे. हे मैदान खेळाचे आहे; येथे पंच आहेत, पण पंचनामा नाही—नोंद होईल ती विक्रमांची,” अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण केला.

महाराष्ट्र पोलीस खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी भविष्यात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्येही पोलीस खेळाडूंना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पोलीस दलाच्या ताणतणावपूर्ण कामाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सण-उत्सव, मोर्चे आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा वेळी क्रीडा स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि सहकार्यभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

मुंबई हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले असून सुमारे ९० टक्के प्रकरणे ६० दिवसांत निकाली काढली जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट होत आहे.

शेवटी, “खाकी म्हणजे सेवा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे राज्यभरातील पोलीस एकत्र येत क्रीडांगणावर आपली क्षमता सिद्ध करत असून, महाराष्ट्र पोलीस जागतिक स्तरावर झेप घेण्यास सज्ज असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

5 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

9 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

9 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

9 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

9 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

12 तास ago