मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कलीना (सांताक्रूझ पूर्व) येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री Mangal Prabhat Lodha, गृहराज्यमंत्री Yogesh Kadam, पोलीस महासंचालक Sadanand Date तसेच मुंबई पोलीस आयुक्त Deven Bharti उपस्थित होते.
उद्घाटनावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “सरकार हे केवळ आदेश देणारे नसून पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आहे.” पोलीस दलासाठी आधुनिक सुविधा, दर्जेदार घरे, सुसज्ज पोलीस स्टेशन, अत्याधुनिक शस्त्रे आणि सायबर सुरक्षेसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा स्पर्धेबाबत बोलताना त्यांनी या स्पर्धेला “महाराष्ट्र पोलीस महा ऑलिम्पिक” असे संबोधले. “प्रत्येक सहभागी खेळाडू हा विजेता आहे. हे मैदान खेळाचे आहे; येथे पंच आहेत, पण पंचनामा नाही—नोंद होईल ती विक्रमांची,” अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण केला.
महाराष्ट्र पोलीस खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी भविष्यात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्येही पोलीस खेळाडूंना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पोलीस दलाच्या ताणतणावपूर्ण कामाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सण-उत्सव, मोर्चे आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा वेळी क्रीडा स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि सहकार्यभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
मुंबई हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले असून सुमारे ९० टक्के प्रकरणे ६० दिवसांत निकाली काढली जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट होत आहे.
शेवटी, “खाकी म्हणजे सेवा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे राज्यभरातील पोलीस एकत्र येत क्रीडांगणावर आपली क्षमता सिद्ध करत असून, महाराष्ट्र पोलीस जागतिक स्तरावर झेप घेण्यास सज्ज असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…