महाराष्ट्र

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

परिसर संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ आणि श्वेता वेरणेकर यांनी उपसभापतींच्या दालनात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना, राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा आणि वेग व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

या सादरीकरणानंतर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पुण्यातील प्रत्यक्ष निरीक्षणांचा उल्लेख करत सार्वजनिक वाहतुकीत महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः गर्भवती महिलांना बसमध्ये चढताना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधत, बसच्या पायऱ्या सध्याच्या तुलनेत अधिक खाली ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उंच पायऱ्यांमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संदर्भात परिवहन मंत्र्यांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती देत, लवकरच बेस्ट तसेच राज्यातील इतर बस परिवहन संस्था आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मे महिन्यात ही बैठक घेण्याचा प्रयत्न असून, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, जनजागृती आणि धोरणात्मक नियोजन अत्यावश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

6 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

6 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

6 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

17 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

17 तास ago