मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर, मतदारसंघनिहाय ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे.
यासंदर्भात ॲड. कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेत पत्र सादर केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिशिष्ट ४४ च्या प्रती सार्वजनिक केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मतदानाच्या दिवशी नोंदवलेली आकडेवारी आणि त्यानंतर जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात काँग्रेससह इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही शंका उपस्थित केल्या असून, निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत ‘व्होट चोरी’चा नवीन पॅटर्न वापरण्यात आल्याची जनभावना तयार झाली असल्याचा दावा करत, या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित परिशिष्ट तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे ॲड. कोंडविलकर यांनी म्हटले आहे.
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…