मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे.
राज्यातील सीमावर्ती भाग, प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर नाकाबंदी करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे तसेच प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल.
“मोटार वाहन कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.विशेष पथकांमार्फत अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यावर भर दिला जाणार असून, मोहिमेचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…
विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…
मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…
एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…
शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…
मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…