मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे.
राज्यातील सीमावर्ती भाग, प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर नाकाबंदी करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे तसेच प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल.
“मोटार वाहन कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.विशेष पथकांमार्फत अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यावर भर दिला जाणार असून, मोहिमेचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुंबई : देशातील तपास यंत्रणा, न्यायप्रक्रिया आणि उद्योगविश्व यांच्यातील संबंधांवर सध्या मोठी चर्चा सुरू असून,…
औरंगाबाद: ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे,…
काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ…
अनेक लोक पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन करत आहेत. हिरवागार निसर्ग जणू आपल्याला त्याच्याकडे बोलावूनच…
म्हशीचं दूध घट्ट आणि गायीचं दूध पातळ असतं. गायीच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं चार टक्क्यांपर्यंत…
दहा दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ नवी दिल्ली: देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा…