मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे.
राज्यातील सीमावर्ती भाग, प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर नाकाबंदी करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे तसेच प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल.
“मोटार वाहन कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.विशेष पथकांमार्फत अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यावर भर दिला जाणार असून, मोहिमेचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार…
मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला…
सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं…
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी…
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की…