मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या परिसंवादात ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची प्रभावी मांडणी
मुंबई: कृषी व विपणन व्यवस्थेचा वेगवान विकास साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
फिलिपाईन्समधील मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासाचा दृष्टीकोन मांडत ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या संकल्पनेची प्रभावी मांडणी केली.
या परिसंवादात तिमोर-लेस्तेचे उपपंतप्रधान मारीनो आसानामी सबीनो लोपस, जपानचे कृषी, वन व मत्स्यव्यवसाय उपमंत्री योईची वाटानाबे, तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यांच्यासह विविध देशांतील मान्यवर उपस्थित होते.
परिसंवादादरम्यान जागतिक कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने, शाश्वत अन्नप्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा झाली. यावेळी रावल यांनी राज्यातील कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण, बाजारपेठेतील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असल्याचे सांगत, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही व्यापक सुधारणा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला आशियाई विकास बँकेच्या भारतातील संचालिका मिओ ओका, वरिष्ठ अधिकारी ताकेशी उएडा आणि क्रिशन रोतेला यांचीही उपस्थिती होती. या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट होण्यास सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, या दौऱ्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यावर भर देण्यात येत असून, भविष्यातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेतला जात आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…