महाराष्ट्र

पाणीपट्टी वसुलीत कडक, पण स्वच्छ पाण्यात ढिलाई? जल विभागावर सवाल

दूषित पाण्यावर मुंबईकरांचा जीव धोक्यात; तात्काळ उपाय न केल्यास आंदोलन; ॲड. अमोल मातेले

मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रमुख अभियंता (जल विभाग) यांना ई-मेलद्वारे इशारा दिला आहे.

मुंबईसारख्या महानगरात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिका प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळलेले, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे मातेले यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय वारंवार होणारी पाणी कपात आणि जलवाहिन्यांमधील गळतीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याउलट महानगरपालिका प्रशासन नागरिकांकडून पाणीपट्टी व जलदेयक वसुलीसाठी कठोर कारवाई करत असून थकबाकीदारांवर पाणी जोडणी तोडण्याचा इशारा दिला जात आहे. मात्र नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या जबाबदारीकडे जल विभागाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मातेले यांनी जल विभागाकडे खालील मागण्या केल्या आहेत :

दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असलेल्या भागांची तातडीने चौकशी करावी.

संबंधित जलवाहिन्यांची तांत्रिक तपासणी करून गळती किंवा सांडपाणी मिश्रण आढळल्यास त्वरित दुरुस्ती करावी.

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

जल विभागाच्या निष्काळजीपणामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित तपासणी व प्रभावी नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करावी.

दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असेही ॲड. मातेले यांनी स्पष्ट केले.सदर पत्राची प्रत मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच सर्व विभागांच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांना पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

6 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

6 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

6 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

6 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

6 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

15 तास ago