महाराष्ट्र

पाणीपट्टी वसुलीत कडक, पण स्वच्छ पाण्यात ढिलाई? जल विभागावर सवाल

दूषित पाण्यावर मुंबईकरांचा जीव धोक्यात; तात्काळ उपाय न केल्यास आंदोलन; ॲड. अमोल मातेले

मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रमुख अभियंता (जल विभाग) यांना ई-मेलद्वारे इशारा दिला आहे.

मुंबईसारख्या महानगरात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिका प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळलेले, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे मातेले यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय वारंवार होणारी पाणी कपात आणि जलवाहिन्यांमधील गळतीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याउलट महानगरपालिका प्रशासन नागरिकांकडून पाणीपट्टी व जलदेयक वसुलीसाठी कठोर कारवाई करत असून थकबाकीदारांवर पाणी जोडणी तोडण्याचा इशारा दिला जात आहे. मात्र नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या जबाबदारीकडे जल विभागाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मातेले यांनी जल विभागाकडे खालील मागण्या केल्या आहेत :

दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असलेल्या भागांची तातडीने चौकशी करावी.

संबंधित जलवाहिन्यांची तांत्रिक तपासणी करून गळती किंवा सांडपाणी मिश्रण आढळल्यास त्वरित दुरुस्ती करावी.

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

जल विभागाच्या निष्काळजीपणामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित तपासणी व प्रभावी नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करावी.

दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असेही ॲड. मातेले यांनी स्पष्ट केले.सदर पत्राची प्रत मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच सर्व विभागांच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांना पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago