महाराष्ट्र

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या हंगामात देशभरात सुमारे २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचा दर सुमारे ३,६०० ते ३,७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. मागील वर्षी हा दर सुमारे ४,५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्या वेळी सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता. मात्र प्रत्यक्षात सुमारे ८ लाख टन साखरेचीच निर्यात झाली होती. त्यानंतर काही साखर कारखान्यांना शेवटच्या टप्प्यात कमी दराने साखर विकावी लागली होती.

यावर्षी सरकारने साखर निर्यातीचा कोटा वाढवून २० लाख टन केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सुमारे चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली असून करारांमुळे जास्तीत जास्त पाच लाख टन साखर निर्यात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशातील साखरेचा वार्षिक खप पूर्वी सुमारे ३०० लाख टनांच्या आसपास होता. मात्र यावर्षी विक्रीचा कल पाहता एकूण खप सुमारे २७० लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पहिल्या सहा महिन्यांत सुमारे १३३ लाख टन साखर विक्री झाली आहे.

साखर क्षेत्रातील अभ्यासक दिलीप पाटील यांच्या मते, साखर उद्योगाला यंदा २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी असली तरी आतापर्यंत केवळ चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली आहे. अगोदरच दर कमी होते, त्यात आता युद्धाच्या परिणामामुळे निर्यातीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी सांगितले की, मध्य आशिया परिसरातील तणाव आणि सुएझ कालव्यातील वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला फटका बसत आहे.

ठळक मुद्दे :

देशातील अंदाजे साखर उत्पादन : २९५ ते ३०० लाख टन

अपेक्षित साखर निर्यात कोटा : २० लाख टन

आतापर्यंत झालेली निर्यात : सुमारे ४ लाख टन

करारांमुळे अपेक्षित निर्यात : जास्तीत जास्त ५ लाख टन

देशांतर्गत बाजारात राहणारी अतिरिक्त साखर : सुमारे १५ लाख टन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

3 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

3 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

6 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

9 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

9 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

9 तास ago