महाराष्ट्र

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या हंगामात देशभरात सुमारे २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचा दर सुमारे ३,६०० ते ३,७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. मागील वर्षी हा दर सुमारे ४,५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्या वेळी सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता. मात्र प्रत्यक्षात सुमारे ८ लाख टन साखरेचीच निर्यात झाली होती. त्यानंतर काही साखर कारखान्यांना शेवटच्या टप्प्यात कमी दराने साखर विकावी लागली होती.

यावर्षी सरकारने साखर निर्यातीचा कोटा वाढवून २० लाख टन केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सुमारे चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली असून करारांमुळे जास्तीत जास्त पाच लाख टन साखर निर्यात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशातील साखरेचा वार्षिक खप पूर्वी सुमारे ३०० लाख टनांच्या आसपास होता. मात्र यावर्षी विक्रीचा कल पाहता एकूण खप सुमारे २७० लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पहिल्या सहा महिन्यांत सुमारे १३३ लाख टन साखर विक्री झाली आहे.

साखर क्षेत्रातील अभ्यासक दिलीप पाटील यांच्या मते, साखर उद्योगाला यंदा २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी असली तरी आतापर्यंत केवळ चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली आहे. अगोदरच दर कमी होते, त्यात आता युद्धाच्या परिणामामुळे निर्यातीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी सांगितले की, मध्य आशिया परिसरातील तणाव आणि सुएझ कालव्यातील वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला फटका बसत आहे.

ठळक मुद्दे :

देशातील अंदाजे साखर उत्पादन : २९५ ते ३०० लाख टन

अपेक्षित साखर निर्यात कोटा : २० लाख टन

आतापर्यंत झालेली निर्यात : सुमारे ४ लाख टन

करारांमुळे अपेक्षित निर्यात : जास्तीत जास्त ५ लाख टन

देशांतर्गत बाजारात राहणारी अतिरिक्त साखर : सुमारे १५ लाख टन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

5 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

5 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

5 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

5 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

5 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

6 तास ago